-
अध्यात्म म्हणजे नेमके काय
...प.पु. गुरुमाउली सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या उपदेशा नुसार मला समजलेले अध्यात्म ........
(१) सर्वसाधारण पणे हा देह मन चालवत असतो त्यामुळे त्या मनात येईल ते आपण करत असतो ते बरोबर कि चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म......१
(२) परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक.त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेंव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्याम होय. -2
(३) परमेश्वर निर्मित सृष्टीच्या रचनेस व नियमावलीस समजू घेणे व त्यावर (जन्म,मृत्यू,संकटे,आनंद,दु:ख इ)पूर्ण विश्वास ठेवणे,त्याने डोके रिकामे ठेवण्याची म्हणजे अनावश्यक गोष्टींवर वर अजिबात लक्ष न देण्याची आठवण होऊन पूर्णतः दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेण्याचे शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे श्रध्दा जाग्रुत करणे.-3
(४) मनासारखे कोणालाच जगता येत नसते,परस्थिती नुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.-4
(५) मनात चांगल्या विचारामुळे चांगल्या इच्छा निर्णाण होतात .चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच अशा सर्व इच्छा पुरतीचा मार्ग म्हणजे अध्यात्म....५